Tuesday, 3 July 2012

पावसावर बोलू काही !!


पावसावर बोलू काही !!

काल पाऊस निनादत आला
पांघरुनी गर्द हिरवा शेला
निसर्गही बहरुनी गेला

भिजते झाड, इमारत अन झोपडे
त्याला नसते तमा, तुम्ही सरळ की वाकडे
तो बरसतो शेतात,अंगणात, अन टेरेसवरही
तो बरसतो तसाच भारत,चीन,अन पाकवरही

त्याला नसतात कशाच्या सीमा
हा उच्च तो नीच,हा काळा तो गोरा
हा देशी तो विदेशी, हा घाटी तो बिहारी
हि असते आपल्या कौर्याची परिसीमा

बरे झाले 'देव' नाही
तो निसर्ग आहे
त्यावरही 'हक्क' सांगण्याची
बडव्यांची दृष्टि वक्र आहे
अरे गबाळ्यांनो यज्ञ-यागाने येईल तो कसा?
हे निसर्ग चक्र आहे.

-मिलिंदा (०३-०७-२०१२)
 —



No comments:

Post a Comment