थोर महापुरुष हे कधिही कोणत्याही समाजाचे नसतात.
त्यांच्या कार्यामुळे ते या सर्वा पलिकडे गेलेले असतात.
मात्र त्यांच्याशी संबंधित असलेले समाजघटक
त्यांच्याशी एका भावनीक नात्याने जास्त घनीष्टपणे जुडलेले असतात
त्यामुळे त्यांच्यात एक नाते निर्माण झालेले असते जे नैसर्गीक आहे.
या बद्दल कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही
मात्र कधी कधी त्याची गैरसोयही होते आणि मग आपण व्यक्तिकेंद्रित/व्यक्तिपुजक होतो
यातून फुले-शाहू-आंबेडकर,छ.शिवाजी महाराज,गाडगेबाबा ,संत ,
लेखक, कवी ,कलाकार ,प्रसिद्धव्यक्ति हे ही सुटलेले नाहीत.
काल राजर्षि शाहू महाराजांची जयंती निमित्त
बर्याच आंबेडकरी बांधवांनी स्वतःचे प्रोफाइल पिक
चेन्ज करुन राजर्षि शाहू महाराजांचे फोटो लावले होते.
सर्व फेसबुक राजर्षि शाहू महाराजांचे फोटोनी सजून गेले होते.बरे वाटले.
काल दादर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे
पिपल्स एजुकेशन सोसायटि यांच्या विद्यमाने
छत्रपती शाहू महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली,
ज्यांची नाळ चळवळीशी जोडल्या गेली आहे
त्यांना महापुरुषांची जयंती साजरी करण्यास सांगावे लागत नाही.
त्या कार्यक्रमाचा एक साक्षिदार म्हणून मला इथे अभिमानाने हे सांगावेसे वाटते कि
आंबेडकरी समाज हा नेहमी खुल्यामनाने,स्वच्छ आणि प्रामाणिक भावनेने
कोणतीही अढि न बाळगता महापुरुषांचा आणि त्यांच्या विचारांचा आदर बाळगतो,
आणि ते कृतीतूनही दाखवून देतो.
याच कार्यक्रमात आगरी समाजाचे पुढारी,
वक्ते म्हणून आलेले आयु.राजाराम पाटिल हे उपस्थितांना संबोधित करताना
म्हणाले "गेल्या काही वर्षापासून मी चळवळीत आहे पण एका 'वेगळ्या' चळवळीत
ज्या चळवळीत माणसा माणसांत भेद केला जातो,
इतरांना तुच्छ लेखकले जाते,जीथे केवळ विषमता जोपासली जाते
तीथे माझी घुसमट होत होती त्या "हिंदुत्ववादि" चळवळीत मी काम करत होतो,
पण जेव्हा मला आंबेडकरी चळवळ, त्यांचे कार्य,समतावादि तत्व ,
सामाजीक सलोखा या गोष्टि समजल्या तेव्हा
मी कळून चुकलो की मी चुकिच्या मार्गावर आहे,
आणि आपसूकच मी या आंबेडकरी चळवळीशी जोडलो गेलो,
जी चळवळ केवळ माणूस हा केंद्रबिंदु माणून
त्याच्या सर्वांगीन विकास साधण्याच्या दृष्टिने प्रयत्नशील असते
त्या चळवळीतूनच पुढे कार्य करुन समाजाचा विकास साधणे हे ध्येय समोर ठेवले आहे."
या बोलक्या प्रतिपादनानंतर आणखी काय बोलणे शिल्लक राहते का?
या कार्यक्रमास माझ्या बरोबर माझे सहकारी आयु.गणेशजी चव्हाण,
अॅड.हरिशजी निरभवणे, अमोलजी गायकवाड, भुषण जाधव आदि उपस्थित होते.
It WAS A FANTASTIC EXPERIENCE AND IT IR TRUTH THAT ONLY AMBEDKARITE PEOPLE IS CONCERN ABOUT THE REAL TEACHING AND WORK OF THESE LEGENDS ...
ReplyDeleteTHANKS MILINDA
AMOL GAIKWAD
Yes, Amoljee
ReplyDeletethanks for comment