दिनांक -१७-०६-२०१२
सुशिक्षित आंबेडकरी तरुण आणि पर्यायाने आंबेडकरी समाज आज कुठेही कमी पडत नाही.
आज हे मला अभिमानाने सांगायचे आहे.
(सर्व शक्यता/ आणि अपवाद वगळून)
बाबा तुमच्या शिकलेल्या (लोकांनी )तरुणांनी तुम्हाला 'धोका' दिला नाही.
ज्ञानाचे क्षेत्र असो ,कि सामाजिक ,
सांस्कृतीक कलेचे असो कि अभिजात साहित्य क्षेत्र
आज आंबेडकरी समाजातील तरुण/तरूणी आपला वेगळा ठसा उमटवू पहात आहेत,
आणि त्यात यशस्विही होत आहेत.
अर्थात त्याच बरोबर हा समाज केवळ राजकिय क्षेत्रात अपयशी होतो आहे
हे वास्तवही मी इथे प्रामाणिकपणे स्विकारतो.
अता गरज आहे ती फक्त सामाजिक दायित्व ओळखण्याची.
आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करण्याची ,
आणि संघटितपणे प्रस्थापितांशी लढण्याची.
अता मुळ मुद्यावर येतो,
तर काल आमचे एक मित्र आयु. अमोलजी गायकवाड
यांचा वाढदिवस व संघटनेची रविवारची मिटींग हे दोन्ही एकाच दिवशी (रविवारी) आले,
त्यामुळे टिम मध्ये कमालिचा उत्साह होता,
आधिच उल्हास त्यात श्रावणमास असे काहिसे वातावरण ;-)
नेहमी प्रमाणे परमपुज्य डॉ.बाबासाहेबांना अभिवादन करुन सुरुवात झाली.
आज चैत्यभुमी समोरील समुद्रालाही उधाण आले होते,
पावसाचे बरसणे चालूच होते,
अशा प्रतिकुल परिस्थितीतही लोक अभिवादन करायला मोठ्या संख्येने चैत्यभुमिवर येत होते,
हे पाहून मनोमन सुखावलो आणि आपसुकच
बाबांनी केलेल्या उत्तुंग कार्यापुढे ओलावलेल्या कडांनी नतमस्तक झालो.
एक सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबिर
आयोजनानुसार आम्हि मग नियोजीत रक्तपेढि कडे मोर्चा वळविला.
तो कार्यक्रम आटोपून आम्हि पुन्हा चैत्यभुमीकडे परतलो
दोन- दोन प्रमाणे गट करुन भरपावसात धम्म प्रसार आणि प्रबोधनाचे कार्यसुरु झाले.
हल्ली लोक जागृत झाले आहेत, प्रबोधन,वाचन यामुळे
चैत्यभुमीला बौद्धेतर लोकांचीही गर्दि मोठ्या प्रमाणावर होते आहे,
त्यातूनच मग जवळच असलेल्या सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेऊन
चैत्यभुमिला भेट देणार्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे,
या अनुशषंगाने बौद्ध समाजातील व्यक्तिंना नम्रपणे २२ प्रतिज्ञा
आणि त्याचे आपल्या जीवनातील महत्व पटवून देण्याचा यशस्वि प्रयत्न केला,
यास लोकांचाहि चांगला प्रतिसाद मिळाला,
या वेळी २२ प्रतिज्ञा अभियानवाले आयु.अरविंदजी सोनटक्के यांचे कार्य
किती महत्वाचे आणि गरजेचे आहे याचा प्रत्यय आला.
त्यांना सप्रेम जयभीम !!
ग्रासलेवलवरील या कामाने प्रेरीत होऊन
काही महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी तर संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
त्या सर्वांचे स्वागत आहे.
साधारण तीनच्या सुमारास सर्वाच्या पोटात कावळ्यांनी काव-काव सुरु केली ,
मग सर्वांनी मोर्चा हॉटेलकडे वळविला,
आणि इथेच रविवारच्या दुसर्या अंकाला सुरुवात झाली.
हॉटेल तसे उच्चभ्रूवस्तित आणि पॉश होते,
अमोलजींचा वाढदिवसही इथेच साजरा करण्यात आला,
बाजूच्या टेबलवर काही मित्रमंडळी बसली होती.
आमच्या थट्टा-मस्करीयुक्त हास्यफवार्यांनी त्यांनाही कळले की
हे लोक वाढदिवस साजरा करत आहेत.
यातच त्यांच्यामध्ये चाललेल्या चर्चेत
छ.शिवाजी महाराज आणी जावळीचे मोरे यांचा उल्लेख आला,
त्यामुळे आमचे कान टवकारले गेले
"इतिहासात जावळीच्या मोरेंची चुकिची नोंद झाली आहे."
असे त्यांच्यामधिल एक व्यक्ति त्याच्या मित्रांना पटवून देत होता
तेव्हा जावळीच्या मोरेंची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत असलेली व्यक्ति
हि मोरेंचे वंशज असल्याचे कळले
समीर मोरे,असे त्या व्यक्तिचे नाव,
शेवटि न रहावून मी त्यांच्या चर्चेत भाग घेतला,
म्हणले पाहुया आजच्या या सो-कॉल्ड तरुणपिढिला किती इतिहास माहित आहे
आणि त्या शिवाय जावळीच्या मोरेंचे साक्षात वंशजच इथे असल्यामुळे
आणखी काही गोष्टि जाणून घ्यायची तीव्र इच्छा वाढली होती.
म्हणून प्रथम माझि ओळख सांगितली त्यानीही स्वतःची ओळख सांगताना
सांगितले हा आयटि इंजीनीअर, हा वकिल ,हा डॉक्टर
असे बोलून त्याने त्याच्या सो-कॉल्ड विचारसरणीला अधोरेखीत केले.
अर्थात आमच्यातही एमबीए केलेले ,इंजीनीअर्स, वकिल,उच्चशिक्षित होतेच
पण 'त्यांच्या' बोलण्यातला नैसर्गीक अभिनिवेश स्पष्ट जाणवत होता
छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक कसा झाला? आणि कुणी केला?
हा पहिला प्रश्न मी विचारला.
आणि माझा अपेक्षा भंग झाला ,
उच्चशिक्षित असलेल्या या लोकांना या बद्दल्ल फारशी माहितीच नव्हती.
एव्हाना आमच्या इतर सहकार्यांनीही त्यांच्या टेबलचा ताबा घेतला होता
केवळ फेसबुकवर लेख ,चर्चा, आणि वाद- विवाद न करता
प्रत्यक्ष बाहेर लोकांशी वैचारीक वाद- विवाद करणारे आणि संवाद साधणारे
'भीमके बच्चे' पाहून मला अतिशय आनंद झाला.
मी ,आयु.आतिष कसबे,आयु.अमोल गायकवाड,आयु. सुमीत चव्हाण, आयु.गणेश चव्हाण,
आयु.भुषण जाधव ,
यांनी बाबासाहेब, भारताचा इतिहास, रिप्ब्लिकन राजकारण,
आरक्षण, मायावती,नक्षलवाद,खैरलांजी ,शिवसेना, मनसे,
मराठी अस्मिता आणि त्याचे राजकारण , वेगळ्या राज्याची मागणी
यावर मांडलेले तर्कशुद्ध मुद्दे आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला दिलेले सडेतोड उत्तर उसका जवाब नही.
जावळीच्या मोरेंचे वंशज समीर मोरेंचे अक्षरशहा डोळे पांढरे व्हायची वेळ आली.
आणि प्रकरण मुद्यांवरुन गुद्यावर येता येता राहिले,
अर्थात
जावळीच्या मोरेंनीच परिस्थितीचा अंदाज घेतला
आणि चक्क जाहिर विचारले कि तुम्ही लोक आत्ता किती आहात?(संख्येत)
तेव्हा आम्ही सहा आहोत( ते सुद्धा सहाच होते) असे सांगितल्यावर
मोरेंनी चक्क माघार हेत म्हणले जाऊ द्या यार तुम्ही आम्हाला इथेच मातीत गाडाल,
(यावर दोन्ही बाजूंनी प्रचंड हशा ...)
अर्थात भीमाच्या लेकरांचा आवेशही असाच होता,
त्यावेळी कुणीही शत्रु असता तर तो धुळीस मिळाला असता एव्हढे खात्रीने सांगतो,
एव्हढ्या वर्षांचा दबलेला ज्वालामुखी,अन्याय,अत्याचार ,
परमपुज्य डॉ.बाबासाहेबांचा वारंवार केला जाणारा अपमान
या सर्वाचा परिपाक त्या आवेषात दिसत होता,
तरीही सर्वांनीच कमालीचा संयम बाळगला होता हे विशेष,
यात दोन प्रतिक्रिया फार महत्वाच्या आणि विचित्र होत्या
समाजात चुकिच्या गोष्टि सत्य माणने,चुकिची माहिती,आणि समज
ज्या आजही असे दर्शवितात कि
सो-कॉल्ड समाजातील यंगजनरेशन
हे अजुनही जातीय अन्याय,अत्याचार, आरक्षण या बद्दल कमालीचे अनभिज्ञ आहे.
एक प्रतिक्रिया होती विवेक पंडित (ब्राह्मण)यांच्या मते पुर्वि जो समाज शिकला
त्यानी त्यांच्या पद्धतीने सर्वांना (अज्ञान,अंधरात) ठेवले,
यावर एकच उपाय आहे तुम्ही लोक शिका.या सर्व गोष्टिंना ब्राह्मणच जबाबदार आहेत,
मी स्वतः एक ब्राह्मण असून असे बोलतोय,
यावर ,घरी अठरा विश्व दारिद्र्य असताना आणि
पावलोपावली केले जाणारे अन्याय, अत्याचार, गळचेपी,
आरक्षण बंद करण्यासाठी केलेली आंदोलने यातून मुलांनी कसे शिकायचे?
यावर मात्र त्यांच्याकडे उत्तर नव्हते.
दुसरी प्रतिक्रिया ओबिसी असलेल्या गणेश आंग्रे यांची
यांच्यामते बाबासाहेबांनी घटनेत केवळ १० दहा वर्षां साठीच आरक्षणाची तरतूद केली होती,
राजकारणी मात्र घाणेरड्या राजकारणांसाठी ते सतत वाढवत आहेत.
हे ऐकून तर हसावे की रडावे तेच कळेना..
हे शिकलेल्या उच्चशिक्षित लोकांचे असे विचार आणि समज असेल तर
मग अशिक्षित सामान्य लोकांचे काय?
सर्व मुद्दे यथोचीत खोडून,समजावून झाल्यानंतर अर्थातच ते सर्व लोक खजील झाले होते,
शेवटि आपण सर्व प्रथम भारतीय आहोत आणि नंतर जात- धर्म या सर्वांच्या सहमतीवर चर्चा
थांबविण्यात आली .एकूणच हा रविवार अविस्मरणीय असाच ठरला.